Monday, 2 April 2007

गणगोत- पुल

वाढत्या वयाबरोबर पुढे पाहण्याऐवजी मन मागेच पाहण्यात रमते... आयुष्याच्या ह्या प्रवासात कितीतरी माणसे भेटली. कुणी शेजारी म्हणून लाभले. कुणी आळीतले आळीकर, कुणी गावातले गावकर. कुणी जवळ आले, कुणी खेचून जवळ घेतले. काहींचे आकर्षण वाढले, काहींचे अचानक कमीही झाले. वर्डसवर्थच्या 'यारो री व्हिजिटेड' सारखी काही माणसे पुनर्भेटीत निराळीच वाटली. काहिंच्या वेव्हलेंग्थस पटकन जमल्या, काहिंच्या नाही जमल्या. काहींनी कधीही न फेडता येणा-या ऋणाचा भार अलगत खांद्यावर ठेवला. प्रत्येकाला हे असे कधी जवळीक तर कधी दुरावा अशा हेलकाव्यात तरंगणारे गणगोत लाभतच असते. माणूस कधीही एकटा नसतो. त्याने तसे असूही नये. माझे 'गणगोत' फार मोठे आहे. अनिलांनी म्हटल्याप्रमाणे 'इथे सखे नि सोबती कुणी इथे कुणी तिथे!
-----प्रस्तावनेतून

पुलं चे चहाते महाराष्ट्रभरच नव्हे तर जगभर पसरलेले आहेत पुल म्हणजे एक चतुःसुत्रि व्यक्तिमत्व. पूलं बद्दल मी लिहायच म्हणजे ज्योतीने तेजाची आरती करण्यासारखेच आहे. पुल हे व्यक्तिमत्वच अस होत की ते प्रत्येकाला वेड लावुन गेल. हास्याचा बादशाहा म्हणुन पसिद्ध असलेल्या या बादशहाने काही अप्रतिम रचना ही केल्या आहेत, गणगोत हे त्यातीलच एक. पुलंच 'व्यक्ति आणि वल्ली' या पुस्तकाप्रमानेच व्यक्तिचित्रावर आधारित हे पुस्तक, पण या व्यक्तिरेखा या काल्पनिक नसुन अस्तित्वातिल आहेत.
व्यक्तिचित्र तर बरेच लिहितात पण त्या व्यक्ति जेव्हा वाचकाशी प्रत्यक्ष बोलु लागतात तेव्हाच त्या लेखकाच लिखाण सार्थकी लागत आणि ही अनुभुती येते ती गणगोत वाचताना. दिनेश वाचाताना तुम्ही लहानपणात जातात तर बळवंत मोरेश्वर पुरंदरे (बाबासाहेब पुरंदरे) वाचताना तुम्ही इतिहासात हरवतात. सामान्य व्यक्तिचे गुण पकडुन किती त्याचे व्यक्तिचित्र किती छानपणे मांडता येत याचा प्रत्यय तुम्हाला चोभे वाचताना नक्कि येईल.
आपापल्या छेत्रातिल दिग्गजांची व त्यांच्या गणगोताची ओळख करुन देण्याचा प्रयत्न पुलंनी ईथे केला आहे. पुलंच हे गणगोत फक्त वाचनासाठी व्यक्तिचित्र नाहित तर तर माहितीचा साठाही आहेत ब-याच जनांची खरी ओळख गणगोत तुम्हाला करुन देईल.

-------सुहास सोनवणे.

Tuesday, 27 March 2007

दुनिया तुला विसरेल - वपु

सुख आणि दुःख मानवी जिवनातिल अविभाज्य घटक आहेत. दु:ख जे नाकारता येत नाहि. पण काहि माणस हि अलौकिक असतात ते दुःखाला कवटाळुन न रहाता त्यामागचे कारण शोधु लागतात, इतर जण माझ्याशी अस का वागली? मनुष्य हा असा एकच प्राणी आहे जो आपल्या दु:खाच उद्दातिकरण करुन त्यातुन काही नविन निर्माण करु शकतो. त्याचच प्रत्यय म्हणजे भाऊसाहेबांची शायरी किंवा भटांच्या गझल. स्वतःच्या दुःखात आसव गाळण्यापेक्षा त्या आसवांतुन लोकांना आनंद निर्माण करुन दिला तो भाऊसाहेबांनी.
भुतकाळातल्या चुका मी परत करणार नाही अस सर्वच म्हणतात पण भाऊसाहेब भुतकाळाला म्हणतात बेट्या जर पुन्हा एकदा जगण्याची संधी दिलीस तर अशीच बेवकूफी करत असाच जगत राहिन.
अता पुस्तकाकडे वळुया विषय आहे भाऊसाहेबांची शायरी. १९६४-६५ च्या काळात भरवलेल्या पाटण्करांच्या एका घरगृती मैफिलिला वपु हजर होते. ती मैफिल व शायरी वपुंनी अतिषय सुंदर शब्दात दिली आहे. वपु म्हणजे सौंदर्य उपासक व्यवसायाने आर्किटेक्ट असलेले वपु हे उत्तम कथालेखनकार, नाटककार आणि सर्वात महत्वाच म्हणजे लहानश्या वस्तुलाही मनापासुन दाद देणारे याचा प्रत्यय पुस्तक वाचताना येतोच.
वपुंनी पुस्त्तकात सुरवातिला म्हटल आहे की तुम्हाला इथे पाटणकरांची शायरी मिळेल पण ती तुम्हाला कडकडुन मिठी मारणार नाही पण तसे काही होत नाही वपु तुम्हाला सरळ त्या मैफिलीत घेऊन जातात. भाऊसाहेब पाटणकर यांच्या शेरावर वपुंच विवचन वाचण्यासारखे आहे.
मुळात भाऊसाहेब पाटणकर यांची शायरी आणि त्याचे रसग्रहण तेही वपुंच्या शब्दात म्हणजे सुवर्णकांचण योगच.
भाऊसाहेबांच्या चाहत्यांनी एकदा तरी वाचाव अस पुस्तक.

"नुसतेच ना दुनियेत तुमच्या, आलो अम्ही गेलो अम्ही
भगवन तुझ्या दुनियेस काही, देऊनी गेलो अम्ही
शायरी तुला अर्पून गेलो, माझे सर्वस्व ती
दुनिया तुला विसरेल भगवन, ना अम्हा विसरेल ती"- भाऊसाहेब पाटणकर


------सुहास सोनवणे.

Saturday, 24 March 2007

"शाळा - मिलिंद बोकिल"

"शाळा" नाव घेताच आठवतात ते बालपणिचे रम्य दिवस. आजच्या धकाधकीच्या जिवनात 'बालपणिचा काळ सुखाचा' असे प्रत्येकाच्या तोंडातुन एकदा तरी निघतेच आणि ते दिवस मिलिंद बोकिल यांनी शव्दात आगदि सहजपणे बांधले आहेत. शाळे विषयी आतापर्यंत बरच वाचल आहे पण सगळ्या भावना शब्दात मिळाल्या ते बोकिल यांच्या शाळेत.
मुकुंद जोशी उर्फ जोश्या आणि त्याचे तिन मित्र चित्र्या, फावड्या, आणि सु-या यांच्या पासुन सुरु होणारे कथानक म्हणजे ईयत्ता ९ वीचे वर्ष. शाळेतिल शिक्षक, त्यांची टोपण नावे (सगळ्याच शाळां मध्ये असतात) त्यांच्या शिकण्याच्या पद्धति. मुलिंची व मुलांची टोपन नावे याबरोबर पुढे जात असतानाच मुकुंद व त्याच्या घरच्यांचिही ओळख हि होतेच.
पौगंडा अवस्थेत होत जाणारे बदल त्यामुळे बदलत होणारे विचार, मनात निर्माण होनारे आकर्षण म्हणा कि प्रेम पण परिणास्तव निर्माण होणारी स्थिती आदि विषयांना लेखकाने अगदि सहजतेने हाताळल आहे.शाळेबरोबर इतर विषय हाताळण्याची लेखकाची हातोटी वाखाडण्याजोगी आहे. भाषेबद्दल बोलायच तर अगदि शाळेत बोलली जाणारी भाषा इथे वाचायला मिळते.
शाळेत गेलेल्या पेत्येकाने वाचाव अस हे पुस्तक आहे.

------सुहास सोनवणे.